आंबराई उद्यान

सांगली शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे आंबराई उद्यान वृक्षवेलींनी बहरलेले असते. आंबराई उद्यान म्हणजे सांगलीचा नैसर्गिक ठेवा आहे. शासनाच्या उपवने व उद्याने विभागाच्या प्रयत्नाने तयार झालेले हे उद्यान सध्या सांगली महानगरपालिकेच्या देखरेखीखाली आहे.

प्रतापसिंह उद्यान

सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक आकर्षक असे उद्यान तयार केले असून या उद्यानास भूतपूर्व सांगली संस्थानचे युवराज कै. प्रतापसिंह यांचे नाव देण्यात आले आहे. या उद्यानात एक सुसज्ज असे प्राणी संग्रहालय असून त्यामध्ये वन्य प्राणी व विविध प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी ठेवण्यात आले आहेत.

सागरेश्वर अभयारण्य

श्री सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील एक रम्य,निसर्गसौंदर्यांने नटलेले,प्राणी,पक्षीनी समृध्द असे पर्यटन स्थळ आहे. कडेगाव वाळवा व पलूस तालूक्याच्या सीमा जोडणार्‍या सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्याअ माथ्यावर हे ठिकाण आहे.अभयारण्या मध्ये उष्ण-कोरडया हवामानातील पानझडी,काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, वड,पिपळ,आपटा ,सीताफळ तसेच माकडी धायटी,घाणेरी ,करवंद,सालफळ आदी झुडपे आढळतात.अभयारण्यातील साळिंदर,सांबर,चितळ,काळ्वीट,खोकड,कोल्हा,लांडगा,तरस आदी प्राणी पर्यटकांसाठी आकर्षण आहेत.धामण,नाग,मरण्यार घोरपड,हे सरपटणारे प्राणी

दंडोबा हिल स्टेशन

मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळ पट्टा असूनही पाहण्यासारखे आणि पाहिल्यानंतर लक्षात राहण्यासारखे कोण्ते निसर्गरम्य ठिकाण असेलतर डोंगर भोसे,मालगाव,सिध्देवाडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत दंडोबा हा डोंगर पसरला आहे.देशिंग गावाच्या हद्दीत डोंगरावर महादेवाचे स्वयंभू स्थान आहे. डोंगरावर वन विभागाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने जुनी व नवीन अशी फार दाट झाडी आहे. नानविधि प्रकारची वनराई, डोंगर पोखरून तयार करण्यात

चांदोली अभयारण्य

चांदोली अभयारण्य सांगली,सातारा,कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौ. किलोमीटर परिसरात वसले आहे. राज्यातले निर्मनुष्य असणारे हे सर्वात मोठे अभयारण्य आहे.सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये असलेल्या आणि निसर्गाच्या विपूल संपत्तीने नटलेल्या चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. विविध प्रकारची झाडे,वृक्षवेली,औषधी वनस्पती,विविध प्राणी या सर्वामुळे चांदोलीचे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांचे आकार्षण ठरत आहे. या अभयारण्यात सांबर,गवा,गेळा,अस्वल,भेकर,कोंळ्शिदा,तरस,साळिदंर,खवले मांजर,रानकुत्रा,कोल्हा.डुक्क्कर

बहे येथील रामलिंग बेट

वाळ्वे तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेट नागरिकाचे श्रध्दास्थान व पर्यटनस्थळ म्हणून सांगली जिल्हयात प्रसिध्द आहे. इस्लामपुरापासून तेरा किलोमीटर अंतरावर बहेलगत कृष्णा नदीच्या पात्रात हे रामलिंग बेट आहे.बेटावर चिंच, वड,पिंपळ,जाभूळ व इतर फुलझाडे यांसारख्या वृक्षवेलीनी परिसर सुशोभित आहे. लंकेहून परत येताना श्रीरमचंद्र कृष्णा स्नानासाठी या ठिकाणी उतरले जवळच असलेल्या शिरटे गावात सीतामाई स्नानासाठी राहिल्या.श्रीरामांनी स्नान करून

दुर्लक्षित कोटलिंग डोंगर

शिराळा-वाळवे तालुक्याच्या सिरहद्दीवर दुर्लक्षित मात्र निसर्गरम्य कोटलिग डोंगर पर्यटनासाठी सुदंर आहे.वाळवे तालुक्यातील डोंगरवाडी व शिराळ तालुक्यातील लादेवाडीच्या गावाच्या दरम्यान असणारा कोटलिंग डोंगर हिरव्यागार वनराईच्या सान्निध्याने नटलेला आहे.या डोंगरावरील शिराळ तालुक्याच्या लादेवाडी गावाकडील बाजूला पुरातन काळातील चार गुहा आहेत. डोंगरावरील एका गुहेची नजर पोहचत नाही इतकी लांबी आहे:मात्र गुहेच्या तोंडचीव रुंदी कमी असल्याने आत जाता येत

दर्गोबा आंनददायी परिसर

खानापूर तालुक्यात मोजक्या धार्मिक स्थळांम्ध्ये दर्गोबाचा समावेश करावा लागतो. डोंगरकपारीत असलेल्या या ठिकाणाचे वेगळे वैशिष्टय मानावे लागले.खानापूर तालुक्यातील सुवर्णनगरी म्हणून पारे गाव ओळखले जाते. विटया पासून नऊ किलोमीटर अंतरावर डोंगर-दर्‍याचा हा परिसर आहे.येथे बारा जोतिर्लिगांपैकी चौथे स्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या दर्गोबाचे पुरातन मंदिर आहे.सभोवताली गर्द झाडी,डोंगर-दर्‍यांचा परिसर,तलावाचे स्वच्छ पाणी,नौकाअ विहार यांमुळे एक दिवसाच्या सहलीचे आंनददायी