पहिले चिंतामणराव उर्फ आप्पासाहेब पटवर्धन

१८०१ मध्ये मूळ मिरज जहागिरीतून फुटून आप्पासाहेबांनी आपलं वेगळं राज्य बनविलं व त्यांनी सांगली राजधानी केली. सांगली राजधानीची स्थापना केल्यानंतर १८०४ मध्ये गणेशदुर्ग या भुईकोट किल्लयाचे बांधकाम त्यांनी करुन घेतले. सांगलीच्या आराध्य देवतेचे श्री गणेश मंदिराचे बांधकाम १८११ साली सुरु झाले. श्रीगणपतीपंचायतन म्हणून हे ओळखले जाते. या मंदिरात श्रीगणेश, शिव, सूर्य, चिंतामणेश्वर, लक्ष्मी – नारायण

सांगलीचे भाग्यविधाते माननीय वसंतदादा पाटील

यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईवडिलांचे लहानपणीच निधन झाले. लहानपण पद्माळे येथे गेले. त्यांनी कॉग्रेस कमिटीची स्थापना केली. १९४० मध्ये स्वातंत्र्यकाळात तुरुंगवास भोगला. १९४२ नंतर प्रशस्त क्रांतीच्या लढ्यात भाग घेतला. १९४३ मध्ये तुरुंगवास भोगला. एकदा तुरुंग फोडून त्यांनी पलायन केल्यानंतर परत अटक करुन १३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. राजेसाहेबांनी १९४६ रोजी वसंतदादांची सुटका केली.