रुग्णसेवेमध्ये निरंतर रमलेले – हरिपूरचे परांजपे घराणे

सांगलीनजीकच, कृष्णा-वारणा संगमाच्या अन्‌ डोंगरांच्या कुशीत वसलेले एक सुंदर मोहमयी बालग्राम- हरिपूर, संगमेश्वराच्या आस्तित्वानं पुनीत झालेलं हरिपूर, साहित्य-कला-नाट्य-संगीत अशा विविध क्षेत्रातील समर्थ परंपरा लाभलेलं हे गाव. याच हरिपूरमध्ये वैद्यकशास्त्राची अन्‌ रुग्णसेवेची थोर परंपरा सुरू झाली आणि गावाची कीर्ती पार अटकेपार पोहोचली ती इथल्या ‘परांजपे ’घराण्यामुळे ! भिषग्‌रत्न वैद्य गणेश पांडुरंग परांजपे यांनी २ जानेवारी १८९२

धन्वंतरी आबासाहेब सांबारे

आबासाहेब सांबारे हे नामांकित वैद्य होते. ते विविध वनस्पतींचे काढे करुन व अर्क करुन औषधे बनवीत असत. त्यांनी औषधाचे पैसे कधीही घेतले नाहीत. त्यांनी कायमस्वरुपी तेरा फुटी लाकडी गणपती तयार करुन गणपती उत्सव सुरु केला.